"......माझ्या मृत्युला कुणीही जबाबदार नसणार...! "
हे वाक्य आजपर्यंत रेंगाळत राहीले
अनाऊंस न झालेल्या निकालासारखे
तरीही स्वत:लाही न जुमानता
व्यक्त होण्यासाठी काहीतरी शोधत होतो
तसा बोटांना ह्या वाक्याचा सराव अनेकदा झालेला
तिथल्या अक्षरांच्या वळणाचीच लय हालचालींतुन कळत होती
यंदा मुठ आवळुन त्यांना त्यांच्याच मिठीत घेतलं
आणि सुरु झाली शोधा शोध
शेवटचा निरोप घेण्या-या
कुणाची तरी....
कुणाला सांगावं..?
काय सांगावं..?
का सांगावं.....
ह्या प्रश्नांनी मला
माझ्याच अडगळीत टाकलं
जिथे विद्रुप होऊन एकटीच
हुंदके देत बसली होती
मिरा..!
तिने मला खेचत आणुन फ़ेकलं
जमिनीवर
जिथे मी मलाच दिसलो
जिवंत..!
काळाच्या पुढे गेलेला
जिवंत..!
जो अद्याप शोधत होता
मोक्षाचं दार...
आणि मिरा स्फ़ुंदत होती
स्वत:चं केशवपन करुन
मला अग्नि द्यायला...
जो अद्याप मेलेला नव्हता...
त्याच्यासाठी...!
माझ्या अंत्यसंस्काराच्या विधीत
मिरा
सध्या पारंगत झालेली आहे
किरवंतासारखी
फ़क्त माझ्या मृत्युसाठी
तिच्याच आभासाला
केतकीचं शरीर मिळावं
कदाचित
तेव्हाच मार्ग सापडेल
श्रध्दांजलीचा..!
जेव्हा दरवळेल मिरा...
केतकीसारखी
किंचित जास्त
माझ्या मृत्युनंतर....!
No comments:
Post a Comment